आयसीटी (म्हणजे इंफॉर्मेशन, कम्युनिकेशन व टेक्नोलॉजी) चा कल्पक व परिणामकारक वापर तुम्ही सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात केला असल्यास नॅसकॉमच्या सामाजिक नवोन्मेष सन्मानासाठी (म्हणजेच ’सोशल इनोवेशन ऑनर्स’ करीता) लगेचच आपले नामांकन पाठवा.
नॅसकॉम या भारतीय सॉफ्टवेअर उद्योगाच्या शिखर संस्थेच्या नॅसकॉम फाउंडेशन या सामाजिक उपक्रमातर्फे सन २००८ पासून सामाजिक परिवर्तनासाठी माहिती, संम्प्रेषण व तंत्रज्ञानाचा (आयसीटीचा) प्रभावी व अनोख्या पद्धतीने उपयोग करणार्या सामाजिक संस्था, सरकारी आस्थापने, विद्यार्थी तसेच व्यावसायिक कंपन्यांचा सन्मान केला जातो. यावर्षी व्यक्तीगत पातळीवर तसेच समूहातर्फेही नामांकने पाठविता येतील. नवोन्मेषी संकल्पना ही एखादी प्रक्रीया, कार्यप्रणाली, उत्पादन किंवा या सर्वांचा संयोग असलेली एखादी संकल्पनाही असू शकते. खालील सात प्रवर्गांमध्ये पुरस्कार प्रदान केले जातील.
नॅसकॉम सामाजिक नवोन्मेष सन्मान २०११
समन्वयक
जयेश
on 07 September 2010
/
संकेत:
अभिनव संकल्पना,
इंटरनेट,
पुरस्कार,
सामाजिक उद्यम
/
Comments: (0)
टाकावू वस्तूंपासून बनविलेल्या खेळण्यांच्या जगात...
लेखक: श्री. प्रभाकर नानावटी
आताच्या शहरी धकाधकीत दोन-अडीच वर्षापासून रतीब घातल्यासारखे शिक्षण देण्याच्या नादात लहान मुलांचे बालपण केव्हा हरवून जाते हेच कळेनासे झाले आहे. त्याबद्दल कुणालाही ना खंत, ना खेद! परंतु अशाही परिस्थितीत काही सुज्ञ, लहान मुलांमधील निरागसपणा, कल्पनारम्यता, सर्जनशीलता टिकविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसतात. कुठेतरी शेवटच्या पानावर त्यांच्याबद्दलची एखादी छोटीशी बातमी असते. लहानांचं जग टिकवण्यासाठी हे ’वेडे’ प्रयत्नशील असतात. पुण्यातील आयुकाच्या परिसरामधील मुक्तांगण विज्ञान शोधिकेत गेली २०-२५ वर्षे कार्यरत असलेले व दिवस-रात्र लहानांच्या ध्यासात गुंतलेले अरविंद गुप्ता हे अशाच काही मोजक्या सुज्ञ ’वेड्यां’ पैकी एक आहेत.
![]() |
| अरविंद गुप्ता |
चिंधी ते सॅनिटरी नॅपकिन !
ग्रामीण भागातील मुलींना अत्यल्प दरात सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्याच्या योजनेबद्दलची पोस्ट सेवायोगवर याआधी आपण वाचली असेलच. श्री. प्रभाकर नानावटी यांचा याच विषयावरील विस्तृत लेख त्यांनी सेवायोगच्या वाचकांसाठी उपलब्ध करुन दिला आहे. नेहमीच्या ब्लॉग पोस्टच्या मानाने हा लेख किंचित मोठा असला तरी नक्किच वाचनीय व उदबोधक आहे.
------------------------------------------------------------------------------
नुकतीच सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण भागात राहाणार्या १५० जिल्ह्यातील १० ते १९ वयोगटातील, दारिद्र्य रेषेखालील, मुलींसाठी स्वस्तात सॅनिटरी नॅपकिन पुरवण्याची एक महत्वाकांक्षी योजना आखली आहे. काही तुरळक सधन स्त्रिया वगळता खेड्यापाड्यातील बहुतेक मुली व स्त्रिया मासिक पाळीच्या दरम्यान अडगळीत ठेवलेल्या कुठल्या तरी अस्वच्छ कापडाची चिंधी वापरून वेळ निभावत असतात. अनेकदा एकच कापड दोघी - तिघीत वापरले जाते. राजस्थानातील काही खेड्यातल्या महिलांना वाळूच्या पिशव्यांची चिंधी या कामी उपयोगी पडते. व्यक्तिगत आरोग्य रक्षणाबद्दलच्या माहितीचा अभाव, प्राथमिक स्वरूपातल्या लैंगिक शिक्षणाबद्दलचे अज्ञान, अशा "विषया" बद्दल चारचौघीत बोलण्याची लाज व कुचंबणा, घरातील अष्टदारिद्र्य व हेळसांडपणामुळे बहुतेक स्त्रिया अनेक प्रकारच्या स्त्रीरोगांना बळी पडतात.
टीव्हीवरील जाहिरातीत गोड गोड चेहर्याच्या त्या कोवळ्या मुली (व त्यांच्या लहान बहिणीसारख्या दिसणार्या त्यांच्या सुंदर आया!) जेव्हा एखाद्या विशिष्ट ब्रँडच्या सॅनिटरी नॅपकिनचे (नको तेवढे!) गुण वर्णन करत असतात
------------------------------------------------------------------------------
नुकतीच सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण भागात राहाणार्या १५० जिल्ह्यातील १० ते १९ वयोगटातील, दारिद्र्य रेषेखालील, मुलींसाठी स्वस्तात सॅनिटरी नॅपकिन पुरवण्याची एक महत्वाकांक्षी योजना आखली आहे. काही तुरळक सधन स्त्रिया वगळता खेड्यापाड्यातील बहुतेक मुली व स्त्रिया मासिक पाळीच्या दरम्यान अडगळीत ठेवलेल्या कुठल्या तरी अस्वच्छ कापडाची चिंधी वापरून वेळ निभावत असतात. अनेकदा एकच कापड दोघी - तिघीत वापरले जाते. राजस्थानातील काही खेड्यातल्या महिलांना वाळूच्या पिशव्यांची चिंधी या कामी उपयोगी पडते. व्यक्तिगत आरोग्य रक्षणाबद्दलच्या माहितीचा अभाव, प्राथमिक स्वरूपातल्या लैंगिक शिक्षणाबद्दलचे अज्ञान, अशा "विषया" बद्दल चारचौघीत बोलण्याची लाज व कुचंबणा, घरातील अष्टदारिद्र्य व हेळसांडपणामुळे बहुतेक स्त्रिया अनेक प्रकारच्या स्त्रीरोगांना बळी पडतात.
टीव्हीवरील जाहिरातीत गोड गोड चेहर्याच्या त्या कोवळ्या मुली (व त्यांच्या लहान बहिणीसारख्या दिसणार्या त्यांच्या सुंदर आया!) जेव्हा एखाद्या विशिष्ट ब्रँडच्या सॅनिटरी नॅपकिनचे (नको तेवढे!) गुण वर्णन करत असतात
पालव बंधुंचा इको फ्रेंडली गणेश
नैसर्गिक साहित्याचा पुरेपूर वापर करत इकोफ्रेंडली अशी गणेशमूर्ती तयार करुन हलक्या आणि मजबूत मूर्तीचा एक आदर्श सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यातील कलाकार प्रमोद पालव यांनी सर्वांच्या समोर ठेवला आहे. या मूर्तींमुळे प्रदूषणाचा प्रश्न सुटला असल्याने प्रमोद पालव यांच्या संशोधनाचा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने गौरव केला असून अशा हलक्या आणि इकोफ्रेंडली गणेशमूर्ती बनवण्याचे पेटंट पालव यांना बहाल करण्यात आले आहे.
वडिलांकडून शिल्पकलेचा वारसा घेतलेल्या पालव बधूंनी या मूर्तीकलेत आणखी संशोधन करत झाडाचा रस, कागद, डिंक आणि शाडू मातीच्या मिश्रणातून अनोखे रसायन निर्माण करुन हलक्या आणि मजबूत गणेशमूर्तीची निर्मिती केली आहे. जे. जे. आर्टमधून पदवी घेतलेले प्रमोद पालव सध्या भालचंद्रनगरी कणकवलीत वास्तव्याला आहेत. नैसर्गिक साहित्याचा मूर्ती कलेत कसा वापर केला जाईल आणि जास्तीत जास्त इकोफ्रेंडली मूर्ती कशी बनेल याकडेच त्यांचा कल असतो.
वडिलांकडून शिल्पकलेचा वारसा घेतलेल्या पालव बधूंनी या मूर्तीकलेत आणखी संशोधन करत झाडाचा रस, कागद, डिंक आणि शाडू मातीच्या मिश्रणातून अनोखे रसायन निर्माण करुन हलक्या आणि मजबूत गणेशमूर्तीची निर्मिती केली आहे. जे. जे. आर्टमधून पदवी घेतलेले प्रमोद पालव सध्या भालचंद्रनगरी कणकवलीत वास्तव्याला आहेत. नैसर्गिक साहित्याचा मूर्ती कलेत कसा वापर केला जाईल आणि जास्तीत जास्त इकोफ्रेंडली मूर्ती कशी बनेल याकडेच त्यांचा कल असतो.
बाएफ तर्फे तरुणांसाठी स्पार्क फेलोशिप
कृषि विकास, शाश्वत जिविका, पर्यावरण संवर्धन व अन्य संबंधित क्षेत्रात गेली चार दशके काम करणार्या बाएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाऊंडेशन या विख्यात संस्थेतर्फे तरुणांसाठी स्पार्क फेलोशिप जाहीर करण्यात आली आहे. एक वर्ष कालावधीच्या या फेलोशिप अंतर्गत सहभागींना १) जैवविविधता / पर्यावरण विज्ञान, २) शिक्षण व ३) जैव तंत्रज्ञान या विषयांवरील प्रकल्पांत काम करण्याची संधी मिळेलच, परंतु त्यासोबतच विशेष तयार केलेल्या अभ्यासक्रमासह कार्यानुभव व संबंधित विषयातील तज्ञांचे मार्गदर्शनही यात अंतर्भुत आहे.

